धानोऱ्यामध्ये सततच्या पावासामुळे सोयाबीनला फुटले मोड
निलंगा:(प्रतिनिधी/इरफान शेख) तालुक्यातील धानोरा सह परिसरात सततच्या झालेल्या पावसानंतर सोयाबीनला मोड फुटले असल्याने परत शेतकर्यांसमोर आस्मानी सुलतानी संकट आहेे एक पावसानंतर सोयाबीन पीक काढणीला आले होते.परंतु मागील आठवड्यापासून सततच्या झालेल्या दमदार पावसामुळे सोयाबीनला मोड फुटले आहेत लाखो रु खर्च करून काढणीला आलेले सोयाबीन गेल्याने शेतकरी चिंतेत आहेत व प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्यातून होत आहे धानोरा ( ये.) येथील तेरणा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे धानोरा ( ये.) सह परिसरातील नागरिकांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे
0 Comments