बडे ब्रेक के बाद दिसणार कांदा ' मुळा ' भाजी ! सुरक्षीत अंतर ठेवत भादेकर। बाजारासाठी झाले राजी !!
गावची तरुणाई आणी बालाजी शिंदे यांच्या प्रयत्नातुन पुन्हा बदलणार गावचे अर्थकारण !
{बाबुराव आगलावे}
भादा : लातुर जिल्ह्यात भादा या गावी एक लंबे ब्रेक के बाद गावची तरुणाई व बालाजी शिंदे यांच्या विशेष प्रयत्नाने गावचा आढवडी भाजीपाला बाजार पुन्हा उद्यापासुन चालु होत असुन गावच्या मरगळलेल्या अर्थव्यवस्थेला यामुळे नव्याने संजीवनी मिळणार आहे.
भाद्यात गेली कित्येक महिने आठवडी बाजार बंदच होता. त्यामुळे गावचे आठवडी अर्थकारण मंदावलेलेच होते. आता पुन्हा नव्या जोमाने हा बाजार भरणार असुन गावच्या अर्थकारणाला यामुळे गती मिळण्यास मदत होणार आहे. या साठी बालाजी शिंदे ' राम पाटील ' रियाज खोजे ' व गावचे अनेक तरुण प्रयत्नशील आहेत.
बाजाराच्या पार्श्वभुमीवर गावातील मुख्य चौकाची आत्ता सध्या मोठ्या प्रमाणात साफ सफाई चालु असुन हे काम वेगाने करण्यात येत आहे.
0 Comments