सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेचे पाणी शेतीला वळविले;भादा ग्रामस्थची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
मागील दहा वर्षाच्या कारकिर्दीला पहिला सुरुंग
बी जी शेख
लातूर: गावासाठी सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या 48 लाख रुपयांचा पाणीपुरवठा योजनेचा पाणी ग्रामस्थांना तहानलेले ठेवून शेतीकडे पळविल्याने भादा गावच्या सरपंच उपसरपंच याविरोधात जिल्हाधिकारी लातूर यांच्याकडे ग्रामस्थांनी तक्रार दाखल केली आहे. तावरजा प्रकल्पातून भादा गावासाठी 48 लाख रुपयांची पाणीपुरवठा योजना राबवून गावापर्यंत पाईपलाईन टाकली आहे. पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन वरचे झाकण काढून पाईपलाईन द्वारे स्वतःच्या विहिरीत पाणी सोडणारे सरपंच व उपसरपंच यांनी गावावर अन्याय केला आहे. गावच्या सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईन मधील दुसरी पाईप जोडणी करून उपसरपंच बालाजी मनोहर शिंदे हे मागील दहा वर्षापासून स्वतःच्या शेतीकडे पाणी पळवीत असल्याने ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. 48 लाख रुपये खर्चून गावात पिण्यासाठी योग्य दाबाने पिण्याचे पाणी येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांना टँकरची वाट पहावी लागते. सध्या मार्च महिना सुरू असून आणखी तीन महिने पाणी समस्येला ग्रामस्थांना तोंड द्यावे लागत आहे. गावासाठी तावरजा प्रकल्पात स्वतंत्र विहीर खोदून 48 लाख रुपयाच्या योजनेस भ्रष्ट कारभार होत असून सरपंच उपसरपंच सोसायटीचे चेअरमन सर्रासपणे गावावर अन्याय करीत आहेत. सरपंच मिनाबाई हनुमंत दरेकर, उपसरपंच बालाजी मनोहर शिंदे, चेअरमन दत्तकुमार शिंदे, तानाजी वामन मोहिते हे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या पाईप लाईन मध्ये व्यत्यय निर्माण करून शेतीकडे पाणी घेत असल्याने त्यांच्यावर बेकायदेशीररीत्या त्याची सखोल चौकशी दोषींवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली आहे.या निवेदनावर किशोर जवंजाळे, साधू बनसोडे, सतीश गवळी,भगवान कटारे, लक्ष्मण गवळी, बालाजी लटूरे, बालाजी माळी, बाळू बुरबुरे, जनमेजय गायकवाड, जयद्रथ उबाळे, अर्जुन लटूरे, पमु लटूरे, गुरुनाथ बनसोडे, परमेश्वर चांभारगे आदीसह अन्य ग्रामस्थांच्या या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.




0 Comments