Latest News

6/recent/ticker-posts

लातूर जिल्ह्यात सर्वत्र मुस्लिम आरक्षणासाठी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

लातूर जिल्ह्यात सर्वत्र मुस्लिम आरक्षणासाठी तहसीलदारां मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन



शेख बी जी

लातूर: दि.१८ मागील अनेक वर्षापासून मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न शासन दरबारी वेळोवेळी मांडण्याचा प्रयत्न समाजाकडून झाला. मात्र प्रत्येक वेळेस शासनाकडून या समाजाची दिशाभूल करण्यात आली. जिल्ह्यात सर्वत्र एक मोहीम राबवण्यात आली.या मोहिमेअंतर्गत प्रत्येक तहसीलदारास स्थानिक मुस्लिम समाजाच्या नागरिकांनी आरक्षणासाठी निवेदने दिली. देशात व राज्यात मुस्लिमांची परिस्थिती पाहाण्यासाठी अनेक कमीशने नियुक्त केली गेली. प्रत्येक कमिशनने मुस्लिमांची आर्थिक-सामाजिक परिस्थिती नाजूक असल्याचे शासनास अहवाल सादर केला. मागास प्रवर्गा पेक्षाही हलाखीची परिस्थिती असल्याचे सांगितले. प्रत्येक वेळेस शासनाने मुस्लिम समाजाची अवहेलना केली आहे. शिक्षणामध्ये मुस्लिम समाजाची प्रगती जितकी हवी आहे तितकी न होण्याची कारणे मुस्लिम समाजाला न मिळालेले आरक्षण आहे .यासाठी शासन दरबारी समाजाच्या वतीने आरक्षणाची मागणी करण्यात येत आहे. आज दिलेल्या निवेदनामध्ये 1) मुस्लिम समाजाला नोकरीत व शिक्षणात दहा टक्के आरक्षण द्यावे 2) स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन केंद्र उपलब्ध करून द्यावे.3) मुस्लिम समाजावर  अत्याचार वाढत आहेत त्यासाठी मुस्लीम संरक्षण कायदा म्हणून ॲट्रॉसिटी कायदा लागू करावा.4) मोबलिंचींग विरोधी कायदा करावा.5) जिल्ह्यात मुस्लिम विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र हॉस्टेलची सुविधा करावी. अशा वेगवेगळ्या मागण्याचे निवेदन सादर करण्यात आले निवेदनावर अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Post a Comment

0 Comments