Latest News

6/recent/ticker-posts

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काढावी लागत आहे चिखलातून वाट; आझाद चौक परिसर पूर्ण चिखलमय

शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना काढावी लागत आहे चिखलातून वाट; आझाद चौक परिसर पूर्ण चिखलमय 


के वाय पटवेकर

नळेगाव: चाकुर तालुक्यातील नळेगाव येथील आझाद चौकातील कै. नरसिंगराव चव्हाण विद्यालय समोर मागील दोन ते तीन दिवसांपासून पडत असलेल्या रिमझिम पावसामुळे शाळेसमोर पावसाचे पाणी थांबून पूर्ण रस्ता चिखलमय झाला असून या शालेय परिसरात खड्ड्यात पाणी साचून रस्ता चिखलमय झाला आहे परिणामी विद्यार्थ्यांना शाळेत जाताना तारेवरची कसरत करत चिखलातून वाट काढावी लागत आहे. यामुळे विद्यार्थ्यांना चिखलाचा व दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. मोठे बाजारपेठेचे गाव असून गावात अनेक शिक्षण संस्था आहेत यामुळे परिसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येथे येतात मात्र स्थानिक प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे  विध्यार्थ्यांना व नागरिकांना चिखलाचा त्रास सहन करावा लागत आहे. नळेगाव येथील आझाद चौक येथे पडलेल्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना व शाळेतील विध्यार्थ्यांना पायी चालणेच शक्य नसल्याने रोज दोन-चार विध्यार्थी पाय घसरून पडत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना दुखापत होत आहे व त्यांचे खच्चीकरण होत आहे. हा रस्ता आझाद चौकातील मुख्य रस्ता असल्याने येथून वाहनांची वर्दळ जास्त असल्याने पावसाचे पाणी साचून चिखल झाल्याने यातूनच विध्यर्थी व नागरिकांना ये-जा करावे लागत आहे. तरी प्रशासनाने या रस्त्याची लवकरात लवकर दुरुस्ती करून गैरसोय दूर करावी अशी मागणी नळेगाव ग्रामस्थांकडून व शाळेतील विद्यार्थ्याकडून होत आहे. तरी ग्रामपंचायत ना याकडे लक्ष देऊन किमान खडक तरी रोडवर टाकावे अशी मागणी होत आहे.

Post a Comment

0 Comments