Latest News

6/recent/ticker-posts

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान वाढवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन

पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे अनुदान वाढवून देण्यासाठी शेतकऱ्यांचे मुख्यमंत्र्यांना तहसीलदारांमार्फत निवेदन


निलंगा:( प्रतिनिधी/रमेश लांबोटे ) शेतकऱ्याच्या नशिबी सतत दुष्काळ, गारपीट, ढगफुटी, अतिवृष्टी, महापूर व रोगराई असे अनेक नैसर्गिक संकटे असताना मध्येच महागाई सारखे कृत्रिम संकट देखील शेतकऱ्यांना नेहमी जीवन जगण्यासाठी कठीण बनले आहे. अशा परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना अत्यंत तोकड्या स्वरुपाची मदत करते पण त्या मदतीने त्या त्या काळच्या टंचाईचे निवारण देखील होत नाही. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकऱ्यांसाठी आणून त्यांच्या अडचणीला थोडीफार मदत करण्याचा प्रयत्न म्हणून दरमहा ५०० रुपयाची मदत दिली जाते. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी हा स्तुत्य उपक्रम असून अतिशय लोकप्रिय योजना ठरली आहे आणि तुटपुंजी का होईना पण प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच लाभ होताना दिसत आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा निधी केंद्र शासनाकडून वाढवून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाने प्रयत्न करावा किंवा महाराष्ट्र शासनाने आपल्या स्तरावरून केंद्रशासन जी दरमहा ५०० रुपये मदत देणार आहे त्यामध्ये राज्य सरकारने आपली स्वतःची भर टाकून शेतकर्‍यांना सन्मानजनक निधी देण्याची तरतूद करावी अशी अपेक्षा शेतकरी वैशंपायन जागले यांनी व्यक्त केली. खरे पाहता अशा महागाईच्या काळात ५०० रुपयांमध्ये काहीही करणे दुरापास्त आहे यासाठी सरकारकडून पीएम किसान योजनेसाठी भरीव मदत तरतूद करून शेतकरी कुटुंबांना दरमहा जास्तीत जास्त निधी देऊन शेतकर्‍याचे दुःख कमी करावे यासाठी शिरूर अनंतपाळ तालुक्यातील शेतकर्‍यांच्या वतीने वैशंपायन जागले, सुधीर  लखनगावे, विजयकुमार कांबळे, उत्तम पांचाळ, चांदपाशा शेख यांनी तहसीलदार अतुल जटाळे यांच्यामार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन दिले आहे.

Post a Comment

0 Comments